समाज कल्याण विभाग

  • प्रस्तावना
राज्य हे दुर्बल तर जनवर्ग विशेषत: अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी व सामाजिक अन्याय यापासून त्यांचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली. त्याद्वारे तळागाळातील गावपातळी पर्यंतच्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभांच्या योजनांचा लाभ घेता यावा, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचाविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येइर्ल यादृष्टीने कार्यपध्दती अमलात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे.

थोडक्यात, समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास करणे हेच समाज कल्याण विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

1 comment: